बागी पानसिंग तोमर


का कुणास ठाऊक, पण पानसिंग तोमारचा सिनेमा आणि सचिनचे शतक दोन्ही एकदम आले, आणि पानसिंगच्या कार्तुत्वापुढे सचिन आणि क्रिकेट खुज वाटू लागल हे नक्की,
घरची प्रचंड गरिबी धावता येत हेच भांडवल प्राथमिक शिक्षण घेतलेल्या पानसिंग तोमरने मग 
"मिळेल ते काम आणि पडतील ते कष्ट"अस म्हणत लष्कराचा रस्ता धरला. वडील, आई, बहीण दुसऱ्याच्या शेतात काम करीत,भांवडांनाही कामाला जावं लागायचं.
अशा परीस्थित हा लष्करात सामील झाला त्यातही मोठ्ह कारण त्याला खायला भरपूर लागत असे आणि खेळाडू म्हणू ते त्याला लष्करात मिळत होते,
पण दुर्दैव पहा त्याला डाकू म्हणून जितकी प्रसिद्धी त्याला मिळाली तितकी खेळाडू म्हणून नाही मिळाली आणि सिनेमात तसा एक डायलॉग देखील आहे ,एकेठिकाणी तीन राज्यांच्या पोलिसांना चकमा देवून तो एक यशस्वी अपहरण करतो लगेच टीव्हीवर आणि रेडीओवर बातमी झळकते डाकू पानसिंग ने अस केल त्यावेळी पानसिंग उद्वेगाने म्हणतो,
"देशासाठी सुवर्ण पदक जिंकत होतो त्यावेळी काल कुत्र विचारात नव्हत आणि तीन राज्यांच्या पोलिसांना चकमा काय दिला सगळीकडे नाव झाल,,,?"
पायात घालायला नीट बूट नसताना पानसिंग तोमरने 
या देशाला 
(१)-२३ वी राष्ट्रीय स्पर्धा कटक १९५८
३००० मिटर्स स्टीपलचेस प्रथम ९ मिनिट १२.४ सेकंद राष्ट्रीय विक्रम,
(२)-२४ वी राष्ट्रीय स्पर्धा त्रिवेंद्रम १९५९
५००० मीटर प्रथम १४ मिनिट ५४ सेकंद राष्ट्रीय विक्रम
३००० मीटर स्टीपलचेस प्रथम ९ मिनिट १७ सेकंद.
(३)-२५ वी राष्ट्रीय स्पर्धा नवी दिल्ली १९६०
५००० मीटर प्रथम १४ मिनिट ४३.२ सेकंद 
३००० स्टीपलचेस प्रथम ९ मिनिट ०७.८ सेकंद 
(४)-२६ वी राष्ट्रीय स्पर्धा जालंधर १९६१
३००० मीटर स्टीपलचेस प्रथम ९मिनित ०२.३ सेकंद राष्ट्रीय विक्रम 
----
बर हे सार पानसिंग तोमार्च्याच बाबतीत या देशात घडत अस नाही असे असंख्य खेळाडू असतील जे योग्य संधी अभावी मागे पडत असतील त्यांना सरकार मदत करताना हात आखडता घेत असेल, नव्हे घेतेच.
काय हव या गुणी खेळाडूंना जे देशासाठी खेळतात?
फक्त पाठीवर मदतीचा हात लई मागण न्हाई देवा लई मागण न्हाई..
त्यांना हवा एका साधा संधीप्रकाश हवा ज्या प्रकाशात देशाच नाव उज्ज्वल करतील असे एकसो एक हिरे ईथे आहेत,

क्रिकेट सामने खेळले जात असताना या देशाच उत्पन्न वाढल कि कमी झालं?
आणि अस जर या देशात घडत असेल तर सुभेदार या पदावर असलेला पानसिंग तोमर डाकू झाला तर ती चूक कुणाची?
वयाच्या ५० व्या वर्षी पोलिसांच्या हातून तो मारला गेला ह्याला जबादार कोण?
पुन्हा जाता जाता सिनेमाचा सुरवातीचा एक डायलॉग सांगावासा वटतो.पत्रकार विचारतो ,तुम्ही डाकू कसे झालात ?
त्यावेळी पानसिंग बोलतो 
"हम डाकू नाही हम तो बागी है साले डाकू तो सांसद में बैठे है."

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या