विज्ञानीय दृष्टीकोनतून भगवतगीता


आदीमाणूस जेव्हा गुहातून बाहेर आला, दगड,झाडांच्या फांद्या, पालापाचोळा वगैरे निसर्गसंपत्ती वापरून आपल्या कुटुंबासाठी निवारा निर्माण करू लागला, विस्तव वापरून हिंस्त्र प्राण्यांपासून संरक्षण करूलागला, पुढे शेतीचे तंत्र आत्मसात करून धान्य साठवू लागला,पशुधन पाळून दूधदुभते मिळवू लागला, तेव्हा त्याला पोटभर अन्नाची शास्वती वाटली, त्याच्या जीवनाला स्थैर्य आले. त्याच्या मेंदूला विचार करण्याची क्षमता येऊ लागली. त्याचा मेंदू झपाट्याने उत्क्रांत होऊ लागला. अवतीभोवतीच्या निसर्गाचे निरीक्षण करण्यासाठी वेळ मिळू लागला. निरनिराळ्या मानवसमूहातल्या विचारवंतांनी निसर्गाच्या निरीक्षणांचे आणि अनुभवांचे, त्यांच्या कुवतीनुसार आणि मिळविलेल्या अनुभवानुसार स्पष्टीकरणे देण्यास सुरुवात केली.

पुरातनकाळातील ऋषीमुनींची,धर्म संस्थापकांची आणि विचारवंतांची अशी कळकळीची इच्छा होती की सर्वप्रजा ज्ञानी, विद्वान, सुसंस्कृत,सुशील, नैतिक मूल्यांचे पालन करणारी, आरोग्यदायी वगैरे सदगुणांनी परिपूर्ण असावी. म्हणजे त्यांची संततीही तशीचगुणवान निपजावी. हे उद्दिष्ठ साधण्यासाठी त्यांनी सात्विक दिनचर्या सांगितली.धर्माचरणे सांगितली. 

आताथोडा विचार करा. मला जर कोणाला माझे विचार पटवावयाचे असतील तर ते त्यांना समजेलअशा भाषेत सांगावे लागतील. माझ्या विचारानुसार त्यांनी आचरण करावे अशी इच्छा असेल तर त्यांना थोडी प्रलोभनेदाखवावी लागतील थोडी भीती दाखवावी लागेल वगैरे वगैरे.

विचारवंतानीनेमके हेच केले. पाप, पुण्य, स्वर्ग, नरक, या जन्मीच्या वाईट कर्मांची फळे पुढच्या जन्मीभोगावी लागतील, चांगली कर्मे केली तर देवाला तुम्ही आवडाल,वाईट कामे केली तर देव तुम्हाला शिक्षा करील, तुमच्यावाईट कर्माची फळे तुमच्या संततीला भोगावी लागतील वगैरे वगैरे.

नंतरच्याशिष्यांनी, त्यांच्याफायद्यासाठी आणि स्वतःचे महत्व वाढविण्यासाठी या प्रलोभनात आणि भीतीच्या परिमाणातआणखी भर तर घातलीच शिवाय जपजाप्य, नवससायास, उपासतापास, दानधर्म, कर्मकांडे वगैरेंची भरही घातली.

ऋषीमुनींनीजी धर्माचरणे सांगितली त्यात पुरेपूर विज्ञान भरलेले आहे. त्यात वेदातील सर्वविज्ञान सामावलेले आहे. पण ते सर्व अध्यात्माच्या महासागरात जे बुडाले आहे ते अजूनबाहेर निघाले नाही.

जगभरच्या निरनिराळ्या मानव समूहातील विचारवंतांनी धार्मिक संस्कृती निर्माणकेली, धर्मग्रंथ निर्माण केले, बोधवचने लिहिली वगैरे, हा इतिहास, फारफार तर इसविसनपूर्व ८ ते १० हजार वर्षापूर्वीपर्यंत जातो.

मानवसमूहातील शक्तिमान व्यक्ती, नेते बनले आणि त्यांनी मानवसमूहाची सत्ता काबीज केली. तर धार्मिक विचारवंतांनीमानवसमूहाची वैचारिक सत्ता काबीज केली. सामान्य माणसांनी या दोघांचीही सत्ता पूर्णतया मानली आणि त्यांच्या आज्ञेबाहेर वर्तन करण्याची हिम्मत दाखविलीच नाही. त्यांच्या आज्ञाबद्दल कोणतीही शंका उपस्थित केली नाही त्यांना प्रश्न विचारले नाहीत.
मूळलेख : शुक्रवार ३० डिसेंबर २०११
(ग्लोबल मराठी)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या